मुंबईत कोण महापौर होणार?, प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे अन् राऊतांना टोले
मुंबईच्या महापौरपदावर बोलताना, अलीकडच्या काळात मुंबईचा महापौर कोण होणार? असं विचारलं जात आहे, यावर सीएम फडणवीस बोलले.
सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यातील (Mumbai) वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यंदा राज्यात एकूण 29 महापालिकांची सोबतच निवडणूक होत आहे. परंतु, या निवडणुकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. काहीही झालं तरी निवडणूक जिंकायची असा निश्चय महायुती तसेच ठाकरे बंधूंनी केला आहे. मुंबई जिंकण्यासाठी आता महायुतीकडून मोठ्या सभांचे आयोजन केलं जात आहे.
आजदेखील (3 जानेवारी) मुंबईत महायुतीची मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. महायुती निवडणुकीत विजयी झाल्यास महापौर कोण होणार? असं विचारलं जात होतं. सोबतच उत्तर भारतीयाला या पदावर बसवले जणार, असा दावा ठाकरे बंधूंकडून केला जात होता. आता फडणवीस यांनी महायुतीच्या महापौरपदाबाबतचा संस्पेन्स संपवून टाकला आहे. त्यांनी मुंबईचा महापौर कोण हाणार, याबाबत जाहीरपणे सांगून टाकले आहे.
भाषणात बोलताना फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांचे नाव न घेती टीका केली. ” मुंबईच्या निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीत काही अबोध बालक आहेत. हे बालक म्हणतात, की सगळं आम्हीच काम केलं. ते कोस्टल रोड, मेट्रोची निर्मिती आम्ही केली, असा दावा ते करतात. परंतु जनतेला सगळं माहिती असतं,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
पुढे बोलताना कोस्टल रोड कोणी केला? बीडीडी चाळीचा विकास कोणी केला? मेट्रोचं काम कोणी केलं? असं मुंबईकरांना अर्ध्या रात्रीजरी विचारलं तरी ते हे सगळं काम महायुतीने केलं, असंच सांगतील. प्रत्येक कामात खोडा कोणी घातला? प्रत्येक कामाला स्थिगिती कोणी केली दिली? हे विचारलं तरी मुंबईकर उद्धव ठाकरे यांचे नाव घेतील,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.
मुंबईच्या महापौरपदावर बोलताना, अलीकडच्या काळात मुंबईचा महापौर कोण होणार? असं विचारलं जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. मुंबईचा महापौर हिंदू समाजातीलच होणार. सोबतच मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होणार, असं जाहीरपणे सांगून टाकलं. परवा एमआयएमचे पारीस पठाण बोलून गेलं की मुंबईमध्ये बुरखेवाली मेअर होणार.
मला वाटलं की मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील. पण मला समजलंच नाही की भोंग्याचं सेल अचानक डाऊन झालं. सकाळचा भोंगाही बोलेना, असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तसंच, त्यांच्यातला कोणीही बोलायला तयार नाही. म्हणूनच आता छोती ठोकून सांगतो की महापौर हा मराठी आणि हिंदूच बनेल, असेही ते म्हणाले. आम्ही फक्त बोलणारे नाही. काही लोक फक्त काम केल्याचे बोर्ड लावतात. परंतु, आमच्या कामाची स्मारकं मात्र मुंबईत दिसतात, असं म्हणत त्यांनी मुंबईकरांनी पालिका आमच्या हातात द्यावी. आम्ही पारदर्शी काम करून मुंबईचा चेहरा बदलून दाखवू, असं आवाहन केलं.
